पोस्ट्स

भारताच्या राष्ट्रपतींना डॉ. सुरेश खैरनार यांचे खुले पत्र: सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून घोषित करा

इमेज
आदरणीय राष्ट्रपती महोदया, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपल्या देशात ३ जानेवारी हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून घोषित करावा. या दिवशी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती आहे. हा ऐतिहासिक दिवस अधिकृतपणे 'शिक्षक दिन' म्हणून ओळखला जावा अशी मी मनापासून प्रार्थना करतो. सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिला आणि शूद्रांसाठी शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी मनुस्मृतीविरुद्ध बंड केले. त्यात श्लोक ९.१८ मध्ये म्हटले आहे: “स्त्रियांसाठी मंत्रांसह कोणताही स्वतंत्र संस्कार विधी नाही; हा धर्मातील निश्चित नियम आहे. स्त्रिया शक्तीहीन आणि मंत्रांशिवाय आहेत.”मनुस्मृती असा आदेश देते की स्त्रियांसाठी विवाह हाच वैदिक संस्कार आहे. गुरूंकडून शिक्षणाची आवश्यकता नाही. पतीची सेवा करणे हेच तिचे गुरुकुल आणि घरकाम हाच तिचा होम आहे. हजारो वर्षे अशा आज्ञांमुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे घट्ट बंद राहिलेत. पेशवाईच्या सनातनी विचारांचे केंद्र पुणे येथे सुमारे १८० वर्षांपूर्वी ज्योतिबा फुले आणि त्यांच्या जीवनसाथी सावित्रीबाई फुले यांनी या विचारसरणीविरुद्ध उघडपणे बंड केले. ...

मिथकांनी वेढलेला मगध साम्राज्याचा बुद्धकालीन खरा इतिहास

इमेज
जरासंधाचा आखाडा की चैत्यगृह  (Wikimedia Commons) उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व हरयाणा या भागातील काही जनसमुदाय स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला महाभारतकालीन जरासंधाचा आधार घेत आहेत. त्या पौराणिक कथा वगळल्यास इतर ऐतिहासिक पुरावे याप्रकरणी दिसून येत नाहीत. मात्र ही स्थळे म्हणजे बौद्ध इतिहासाचे पौराणिकीकरण (Mythologisation of Buddhist sites) कसे झाले याचे अत्यंत महत्त्वाची उदाहरणे ठरतात. राजगीर हे बुद्धकालीन राजगृह आजचे राजगीर (बिहार) हे प्राचीन राजगृह म्हणून ओळखले जाते. महाभारतात राजगृह हे जरासंधाची राजधानी म्हणून वर्णिलेले असले तरी पुरातत्त्वीय उत्खननांमधून येथे जी शहरे, तटबंदी व वसाहती आढळतात त्या मुख्यतः बुद्ध-बिंबिसार–अजातशत्रू यांच्या काळातील मगध साम्राज्याशी संबंधित आहेत. राजगृह हे भगवान बुद्धांचे महत्त्वाचे निवासस्थान होते. येथे बुद्धांनी अनेक वर्षे वास्तव्य केले, उपदेश दिले आणि प्रथम बौद्ध संगीतीसुद्धा याच परिसरात झाली. त्यामुळे जरासंधाच्या नावाने ओळखले जाणारे हे भौगोलिक क्षेत्र प्रत्यक्षात बौद्ध इतिहासाचे पुरावे ठरतात. जरासंधाच्या नावावर बौद्ध संस्कृतीचे अवशेष राजगीर येथील जर...

धार्मिक कट्टरतेतून कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण वास्तव

इमेज
गढीदौलतची काळी रात्र उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गढीदौलत गावात अलीकडेच घडलेली घटना मानवी संवेदनशीलतेला हादरवून टाकणारी आहे. घराबाहेर जाताना केवळ बुरखा न घातल्याच्या कारणावरून एका इसमाने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची निर्घृण हत्या केली व त्यांचे मृतदेह घरातच पुरून ठेवले. ही घटना धार्मिक कट्टरता, रूढीवादी विचार आणि टोकाची नियंत्रण मिळवण्याची प्रवृत्ती यांचे भयावह मिश्र ण होते. जेव्हा धर्माचा अतिरेकी अर्थ डोक्यात भिनतो तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात हे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. पण येथे धार्मिक कट्टरता कौटुंबिक आपुलकीचे बंध टराटरा फाडून टाकते हे भयंकर वास्तव आपणास दिसते. जगभरातील रक्तरंजित इतिहास भारतात 'ऑनर किलिंग'च्या नावाखाली अनेकदा रक्ताचे नातेवाईकच शत्रू बनल्याचे दिसते. मुस्लीम तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे दिल्लीतील अंकित सक्सेना (२०१८) या हिंदू तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी रस्त्यावर गळा चिरून हत्या केली. तेलंगणातील अमृता राव या तरुणीच्या उच्चवर्णीय हिंदू वडिलांनी (२०१८) आपल्या मुलीच्या दलित पतीची (प्रणय पेरूमल्ला) सुपारी देऊन हत्या केली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाची संघर्षातून आदर्शाकडे वाटचाल

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य, त्यांचे दैनंदिन व्यवहार, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि त्या वस्तूंमागील संघर्षकथा हे सारे मिळून भारतीय सामाजिक इतिहासाचा जिवंत दस्तऐवज बनतात. नागपूरजवळील चिंचोली येथील शांतीवन आणि तेथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल व वस्तुसंग्रहालय ही अशीच एक जिवंत इतिहास जपण्याची चळवळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील टायपरायटर, फर्निचर, कपडे व दैनंदिन वस्तू या बाबासाहेबांच्या बौद्धिक श्रमांची, त्यांच्या जगण्याची आणि सामाजिक संघर्षाची साक्ष देतात. संविधान लेखनासारख्या ऐतिहासिक प्रक्रियेत वापरलेली साधने पाहणे ही भावनिक अनुभूती इतिहासाशी थेट संवाद साधते. त्यामुळे चिंचोलीतील संग्रहालय हे आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान ठरते. चिंचोली-शांतीवनाचा वैचारिक अर्थ चिंचोली हे गाव बाबासाहेबांच्या सहकारी व निकटवर्तीय स्मृतिशेष वामनराव गोडबोले यांच्या कार्यामुळे आंबेडकरी इतिहासात महत्त्वाचे ठरते. बाबासाहेब नागपूर परिसरात असताना येथे वास्तव्यास येत असत अशी परंपरागत स्मृती आहे. त्यांच्या वापरातील काही मौल्यवान वस्तू येथेच जतन करण्यात आल्या. पुढे या वस्तू ...

धार्मिक कट्टरतेतील एककारणी भ्रम (मोनोकॉझल फलॅसी)

मोनोकॉझल फलॅसी, ज्याला आपण मराठीत एककारणी भ्रम किंवा एकमेव कारणाचा भ्रम म्हणतो. हा एक असा तर्कदोष आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या गुंतागुंतीच्या घटनेसाठी केवळ एकाच कारणाला जबाबदार धरते. वास्तव हे नेहमीच अनेक पदरांनी बनलेले असते आणि कोणत्याही छोट्या-मोठ्या बदलामागे अनेक घटकांचा परस्परसंबंध असतो. मात्र मानवी मेंदूला गुंतागुंत आवडत नसल्यामुळे तो सरधोपट मार्ग (short cut) निवडतो आणि सर्व दोषांचे खापर एकाच कारणावर फोडतो. धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत हा भ्रम प्रकर्षाने जाणवतो. जेव्हा समाज एखाद्या समस्येसाठी फक्त धर्माला किंवा विशिष्ट शिकवणीला जबाबदार धरतो, तेव्हा तो त्यामागील सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाच्या अशा मानसिक-वैचारिक गुंतागुंतीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. अशी विचारपद्धती अत्यंत घातक ठरू शकते कारण ती आपल्याला समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यापासून रोखते आणि आपल्याला एका आभासी सत्याच्या जगात घेऊन जाते, जिथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ एकच शब्द किंवा एकच घटक असतो. . एखाद्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे केवळ त्या धर्माच्या शिकवणीमुळे झाले असा निष्कर्ष काढला जातो. यात त्या हल...

सोशल मिडियावर फिरणाऱ्या माणेकशॉ, नेहरू यांच्या विषयीच्या खोट्या कथा

व्हॉटस्अॅप वर खालील पोस्ट फिरत असते- हिंदीतून, मराठीतून, इंग्रजीतून. तिची सत्यता पडताळून बघू या. ती पोस्ट अशी आहे- तुम्हाला पिन ड्रॉप ऐकू येतो का? पिन ड्रॉप सायलेन्सचा अर्थ काय आहे? खाली काही उदाहरणे दिली आहेत जेव्हा सायलेन्स आवाजापेक्षा जास्त बोलू शकते. १- फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांनी एकदा अहमदाबाद येथे एका जाहीर सभेला इंग्रजीत संबोधित करण्यास सुरुवात केली. जमाव ओरडला, "गुजरातीमध्ये बोला. तुम्ही गुजरातीमध्ये बोललात तरच आम्ही तुमचे ऐकू." असा घोष करू लागला. फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ थांबले. प्रेक्षकांना कडक नजरेने पाहिले आणि उत्तर दिले,"मित्रांनो, मी माझ्या दीर्घ कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या आहेत. मी शीख रेजिमेंटच्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो आहे; मराठा रेजिमेंटमधून मराठी; मद्रास रेजिमेंटमधून सैनिकांकडून तमिळ; बंगाल रेजिमेंटमधून सैनिकांकडून बंगाली, बिहार रेजिमेंटमधून हिंदी; आणि गुरखा रेजिमेंटमधून नेपाळी देखील. दुर्दैवाने गुजरातमधील असा कोणताही सैनिक नव्हता ज्याच्याकडून मी गुजराती शिकू शकलो असतो." एक पिन ड्रॉप सायलेन्स! २- १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीपासून...

'चेलुवी' : मुलीचे फुलझाड बनते तेव्हा... निसर्गाची आणि स्त्रीत्वाची भावस्पर्शी लोककथा

इमेज
'चेलुवी' हा १९९२ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केला आहे. (हा चित्रपट नंतर कन्नड भाषेतही डब करण्यात आला). मुख्य भूमिकेत असलेल्या सोनाली कुलकर्णी यांचा हा पहिला चित्रपट. सोबत सुषमा, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पर्यावरण संवर्धन यावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट कर्नाटक राज्यातील फुलणारे झाड- एका स्त्रीची कहाणी या पारंपारिक लोककथेवर आधारित आहे. हा चित्रपट निसर्ग, स्त्री आणि सामाजिक शोषण यावर गंभीर भाष्य करतो. संवेदनशील लोककथेवर आधारित चित्रपट 'चेलुवी' ही गरीब कुटुंबातील तरुणी आहे. ती आपल्या आई आणि बहिणीसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. एका साधूने दिलेल्या मंत्रामुळे चेलुवीला एक गुप्त आणि जादुई शक्ती प्राप्त होते. ती स्वतःचे रूपांतरण एका सुगंधित फुलांनी बहरलेल्या झाडात करू शकते. पैसे मिळवण्यासाठी ती या मंत्राचा उपयोग करते. तिच्या झाडाला भरपूर सुगंधी फुले येतात. तिची बहीण अत्यंत काळजीपूर्वक ही फुले गोळा करते. दोघीही त...