पोस्ट्स

भोंदू बुवा-बाबा यांचा भांडाफोड करणाऱ्या सुहानी शाहला 'जादू च्या ऑलंपिक' मध्ये जागतिक दर्जाचे सुवर्ण पदक

इमेज
भोंदू बुवा-बाबा यांचा भांडाफोड करणाऱ्या सुहानी शाहला 'जादू च्या ऑलंपिक' मध्ये जागतिक दर्जाचे सुवर्ण पदक = धनंजय आदित्य ============. सुहानी शाह ही भारतातील प्रसिद्ध मेंटलिस्ट, जादूगार आणि यूट्यूबर आहे. ती आपल्या कार्यक्रमांमधून लोकांचे मन वाचल्यासारखे दाखवते, परंतु यामागे कोणतीही अदृश्य किंवा 'दिव्य' शक्ती नसते. ती स्पष्टपणे सांगते की हे सर्व तिच्या निरीक्षणशक्ती, मानसशास्त्रातील ज्ञान आणि सर्जनशील मेंटल ट्रिक्समुळे शक्य होतं. तिचा उद्देश केवळ मनोरंजन नसून लोकांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे हा आहे. त्यामुळे ती अनेकदा अंधश्रद्धा, भोंदूबाबा आणि खोट्या चमत्कारांचा प्रखर विरोध करत असते. बागेश्वर बाबा यांच्याशी संघर्ष बागेश्वर धामचे प्रमुख, धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा, हे स्वतःला धर्मगुरू आणि दिव्यशक्तीचे धारक मानतात. ते 'दिव्य दरबार'मध्ये लोकांची माहिती सांगतात, त्यांच्या समस्या कथितरीत्या ओळखतात आणि उपाय सांगतात. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांना त्यांच्यावर श्रद्धा वाटते. मात्र, याच कृतींमुळे अनेक अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते आणि विचारवंत त्यांच्यावर टीका ...

झापडबंद माकडांच्या ज्ञानपराङमुख विळख्यातून समाज वाचवण्यासाठी...

इमेज
ज्ञान हे मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती संकलित करणे नसून, ती माहिती समजून घेणे, तिचे विश्लेषण करणे आणि तिचा उपयोग आपल्या जीवनात व समाजाच्या प्रगतीसाठी करणे होय. जेव्हा एखादा समाज ज्ञानापासून दूर जातो, तेव्हा त्याला ज्ञानपराङमुख समाज असे म्हटले जाते. हा केवळ ज्ञानाचा अभाव नसून, ज्ञानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची किंवा त्याला महत्त्व न देण्याची एक आत्मघातकी वृत्ती आहे. अशी वृत्ती कोणत्याही समाजाच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी गंभीर धोका निर्माण करते. ज्ञानपराङमुखतेची कारणे अनेक आणि सखोल असतात, त्यांचे परिणाम भयानक आणि दूरगामी असतात. व्यावहारिक, संस्थात्मक आणि धार्मिक झापडे लावलेल्या अज्ञानातून समाजाला बाहेर पडण्यासाठी एकत्रित व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. ज्ञानपराङमुखतेची कारणे ज्ञानपराङमुखता ही एक गुंतागुंतीची सामाजिक समस्या आहे. ती अनेक सामाजिक घटकांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. ज्ञानपराङमुखतेचे मूळ कारण शिक्षणाच्या मूलभूत संरचनेत आणि समाजाच्या धारणेत दडलेले असते. समाजातील मोठ्या लोकसंख्येला, विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ...

...तरीही मूल का हसतं?

इमेज
सर्वच शाळांमध्ये कोणालाही निर्विवादपणे मनापासून आवडणारी सर्वांगसुंदर गोष्ट असते ती म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हसू! ते हसू र्निव्याज असतं... उत्स्फुर्त असतं... प्रामाणिक असतं! त्यात दिखाऊपणा नसतो... बनावटगिरी नसते... कोणताही अंतःस्थ विपरित हेतू नसतो! शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या साऱ्यांनाच या स्वर्गीय हास्याची मूर्तीमंत संपत्ती भरभरून मिळत असते. कोणा बालकाला कालपरवा रागावलं, मारलं, कोणाला हिणवलं, दुखावलं... तरीही दिवस पालटल्यावर म्हणा... किंवा घटिका लोटल्यावर म्हणा... पुन्हा ते मूल फुलासारखं टवटवित बनून, आपलं निखळ हास्य घेऊन स्वतःभोवती नंदनवन साकारीत असतं! कोणतंही दुःख असो, वेदना असो, घात असो वा आघात असो, हेवेदावे असो की द्वेषमत्सर असो... साऱ्या किल्मिषांना तत्परतेनं बाजुला सारून मुक्त हास्याची उधळण करण्याची दिव्य कला या बालकांना निसर्गतःच बेमालूमपणे साधलेली असते. जन्मतःच टॅहँऽऽ टॅहँऽऽ चा आलाप करीत, रडत आक्रंदत या मर्त्य जगात प्रवेश करणारा बालक आश्चर्यकारकपणे त्याच्या बालपणात मात्र हास्यानं फुललेलं विशाल हृदय घेऊन मनमुराद जगत असतो! आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे। या ...

सिक्कीमच्या भारत प्रवेशाची थरारक कहाणी, १६ मे १९७५ ला सिक्कीम स्थापना दिवस

इमेज
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला; परंतु सर्व राज्ये, संस्थाने त्यावेळी भारतात सामील झाली नाहीत. जम्मू काश्मीर, हैदराबाद, त्रावणकोर यासारख्या राज्यांना स्वतंत्र देश व्हायचे होते. भोपाळ, जुनागढ इत्यादी संस्थानांना पाकिस्तानात जायचे होते. सिक्कीम या राज्याची १६ मे १९७५ ला स्थापना झाली. त्यापूर्वीचा सिक्कीमचा इतिहास फारच वैशिष्ट्यपूर्ण, राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि भूप्रदेशीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. सिक्कीमचा मध्ययुगीन इतिहास १७ व्या शतकात सुरू होतो असे मानले जाते. या कालावधीत ल्हात्सुन चेंपो या बौद्ध भिक्कुने तेथे धम्म प्रसार केला. १६४२ मध्ये फुन्सोक नामग्याल यांना पहिला चोग्याल (राजा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. याने नामग्याल वंशाची सुरुवात झाली. सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. सिक्कीमच्या लोकसंख्येत लेप्चा, भूटिया आणि नंतर स्थलांतरित नेपाळी हे प्रमुख समुदाय होते. १७ व १८ व्या शतकात सिक्कीमचा नेपाळ आणि भूतानशी अनेक वेळा संघर्ष झाला. नेपाळ ...

“वैज्ञानिक दृष्टीकोन दिना”ची कुळकथा

इमेज
वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे उल्लेखनीय भरीव कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" म्हणून अंमलात आणायचा असे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी झटत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी असे कार्य करणारे हजारो लोक महाराष्ट्रात तयार केले. Original Photo From BBC News २०१८ साली २८ फेब्रुवारीला “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. विज्ञान दिवस म्हणजे विज्ञानाचे प्रयोग मांडणे, विज्ञानाची प्रगती सांगणे अशा प्रकारे सामान्यतः सगळीकडे तो साजरा केला जातो. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेल्या गोष्टी, उपचार त्या कार्यक्रमात केले जातात असेही आढळून आले. एका प्रतिथयश शाळेत अंधश्रद्धाळू कर्मकांडासह हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याची बातमी फोटोसह "अंधश्रद्धा निर्मुलन" हे बिरूद लावलेल्या एका ग्रुपवर आयोजकांनी टाकली. त्यावर माझे आक्षेप मी स्पष्टपणे मांडले. परंतु त्यातील कर्मकांडाचे व अवैज्ञानिक उपचारांचे समर्थन स्युडो-सायंटिफिक कारणे देऊन आयोजक मंडळीतर्फे...

'गळी टुपणे' - हा दैवी चमत्कार नव्हेच!

इमेज
१७ एप्रिल १९९९ 'या जगातील कोणतेही चमत्कार हे दैवी नसतात. चमत्कार म्हणून गाजावाजा झालेल्या प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते शास्त्रीय व भौतिक कारण असतेच. अशा तथाकथित चमत्कारांची खरी कारणे आपण समजून घेतली पाहिजेत आणि अंधश्रद्धाळू लोकांना समजावून दिली पाहिजेत.' फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन्सचे अध्यक्ष बी. प्रेमानंद तळमळीने बोलत होते. धर्मनिरपेक्ष मानवतावाद्यांच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात विविध देशांतून आलेले प्रतिनिधी त्यांचा शब्द न् शब्द अंतःकरणात साठवून ठेवत होते. या वेळी बी. प्रेमानंद व त्यांचे सहकारी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील शास्त्रीय कारणांचे स्पष्टीकरणही देत होते. थोड्याच वेळात केरळ रॅशनलिस्ट असोसिएशन व तामीळनाडू रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी शर्ट व बनियन काढले. सर्वांची उत्सुकता ताणली गेली. पाठीत गळ खुपसून करण्यात येणाऱ्या चमत्कारांची प्रात्यक्षिके ते करून दाखवणार होते. प्रथम त्यांच्या छातीच्या व पोटाच्या त्वचेत सुई खुपसून दोऱ्याने ८-९ लिंबे शिवून लटकवण्यात आली. तसेच नास्तिकवादाचा पुरस्कर्ता पेरियार रामास्वामी या...

ही जमीन आधी कोणाची होती?

इमेज
Mother Earth Image from Wikimedia CCA एक राज्य होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. राज्यात सर्व आलबेल होते. सर्व जाती-धर्माचे लोक एक दुसऱ्याशी मिळून मिसळून राहत असायचे. एके दिवशी दरबार भरलेला असताना एक अहमद नावाचा माणूस राजाकडे तक्रार घेऊन आला. तो म्हणाला,” राजेसाहेब, विक्टर नावाचा एक माणूस माझे घर व भोवतालची शेतजमीन बळकावून राहतो आहे. तरी राजे साहेबांनी माझे ते घर व जमीन मला देऊन मला न्याय मिळवून द्यावा.” राजाने त्या विक्टर नावाच्या माणसाला लागलीच बोलावणे धाडले. विक्टर राजदरबारात आल्यानंतर राजाने त्याला विचारले, “ हे सभ्य माणसा, तू अहमद नावाच्या माणसाचे घर बळकावले असा त्याचा आरोप आहे. हा आरोप तुला मान्य आहे का?” विक्टर म्हणाला, “ नाही राजेसाहेब. हे घर सुमारे दीडशे वर्षे आमच्या पूर्वजांच्या ताब्यात आहे. वंशपरंपरागत आम्ही या घरात राहत आहोत. राजसाहेब, आमच्या पूर्वजांनी हे घर व जमीन बळकावले नाही, तर रीतसरपणे विकत घेतले होते. त्यामुळे आमच्या पूर्वजांची ही संपत्ती झाली.” तर राजा म्हणाला, “ हे घर विकत घेतले होते, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे?” विक्टर म्हणाला, “ हे घर विकत घेतल्याची काग...